सावित्रीबाई फुले :
सावित्रीबाई फुले यांच्यावर मागील २५ वर्षांत छोटीमोठी ४० पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यासंबंधीची ग्रंथयादी जी. ए. उगिले यांच्या 'सावित्रीबाई फुले' या छोट्या ग्रंथात दिली; परंतु सत्यशोधक चळवळीचे एक अभ्यासक डॉ. हरी नरके म्हणतात, "या सर्व ग्रंथांत जवळपास तीच तीच माहिती दिलेली आहे. या ४० ग्रंथांपैकी कोणत्याही लेखकाने सावित्रीबाईच्या जीवनकार्याची वस्तुनिष्ठ चिकित्सा केलेली नाही.” काही अपवाद वगळता त्यांचे मत खरे आहे.
सावित्रीबाईचा जन्म इसवी सन १८३१ चा. खंडुजी नेवसे पाटील हे त्यांच्या वडिलांचे नाव. ते नायगाव (खंडाळा पेठ, जिल्हा सातारा) या खेडेगावचे पाटील होते. इ.स. १८४० मध्ये सावित्रीबाईचे लग्न जोतिरावांशी झाले. जोतिरावांचे पूर्वज सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील कडगुण गावचे गोरे फुलमाळी होते. लग्नानंतर सावित्रीबाईंनी मिसेस मिचेल यांनी चालविलेल्या नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षण घेतले. ३ ते ४ वर्षांचा कोर्स सावित्रीने पूर्ण केला, अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले.
१)शैक्षणिक कार्य :
१. नेटिव्ह फिमेल स्कूल्स, पुणे
२) The
Society For Promoting the Education of Mahas, Mangas and Extras. या संस्थेच्या वतीनेच त्यांनी आपले शैक्षणिक कार्य हाती घेतले. या संस्थांची
आर्थिक परिस्थिती वाईट होती तरीही इ.स. १८४८ मध्ये म. फुल्यांना पुण्यात बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. या शाळेसाठी तात्यासाहेब भिडे यांनी मोफत जागा, दरमहा ५ रुपये व प्रारंभिक खर्चासाठी १०१ रुपये देणगी दिली होती. याच शाळेत सावित्रीबाई शिक्षिका होत्या. या शाळेसाठी पालकांच्या भेटी घेऊन मुली मिळवण्याचे काम फुले पती-पत्नीने केले. समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा दूर करावयाच्या असतील तर प्रथम स्त्रियांना शिक्षण दिले पाहिजे हा विचार त्या दोघांनी स्त्रियांसमोर ठेवला. पुण्यात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा १८४८ मध्ये काढली व त्याच वर्षी कार्ल मार्क्सने 'दास कॅपिटल' हा ग्रंथ प्रकाशित केला होता. या दोन्ही घटना तेवढ्याच क्रांतिकारक मानाव्या लागतील. १८४८-१८५२ पर्यंत फुले पती-पत्नीने पुणे शहर व सातारा परिसरात एकूण १८ शाळा काढल्या. फुले दांपत्याच्या या शैक्षणिक कार्यांत विष्णुपंत थत्ते, वामनराव खराडकर, सगुणाबाई क्षीरसागर, फातिमा शेख यांनी शिक्षक म्हणून काम करून सहकार्य केले. स्वत: सावित्रीबाईंचे अध्यापनाचे कार्य सर्वच दृष्ट्या उठावदार व गुणवत्तापूर्ण होते. अत्यंत चिकाटीने, जिद्दीने फुले पती-पत्नीने शैक्षणिक कार्य केले. त्यांच्या या कार्यास पुण्यातील सनातनी वृत्तीच्या लोकांनी विरोध केला होता. त्यांच्या अंगावर चिखलफेक केली; पण सावित्रीबाईने अत्यंत धैर्याने, जिद्दीने, कळकळीने व कौशल्याने शिक्षिका म्हणून काम चालूच ठेवले. तेव्हाचे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ना. जॉन वॉर्डन यांनी १८५१ मध्ये शाळेला भेट दिली तेव्हा त्यांनी म्हटले होते, “ज्योतिबापेक्षा त्यांच्या पत्नीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. तिची योग्यता काय सांगावी? आपल्या पतीबरोबर तिने संपूर्ण सहकार्य केले व त्यांच्याबरोबर सह वाट्यास येईल त्या हालअपेष्टा भोगल्या.” १६ नोव्हेंबर १८५२ रोजी पुण्याच्या विश्रामबाग वाड्यासमोर ब्रिटिश सरकारने ३००० लोकांच्या उपस्थितीत फुले पती-पत्नीचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक कार्यांचा गौरव केला होता. फूले पती-पत्नीने स्वतःच्या घरात एक वसतिगृह चालवले होते. दूरदूरच्या ठिकाणांहून मुले तेथे शिक्षणासाठी येत असत.
अस्पृश्यतेविरुद्ध कार्य : सावित्रीबाईंचे कार्य हे फक्त स्त्री शिक्षणापुरते मर्यादित नाही. स्त्री शिक्षणाबराबरच । अस्पृश्यतेविरुद्धही त्यांनी कार्य केले. १८५१ मध्ये त्यांनी महार वस्तीत स्वतंत्र शाळा काढली. अस्पृश्यांना पाणी उपलब्ध व्हावे म्हणून आपल्या घरातील पाण्याचा हौद त्यांनी। अस्पृश्यांसाठी खुला केला. तिने 'महिला सेवा मंडळ' काढले होते व त्या स्वत: या मंडळाच्या सचिव होत्या. त्याच्या वतीने १८५२ मध्ये पुण्याच्या कलेक्टरच्या पत्नी ई. सी. जोन्स यांच्या अध्यक्षतेखाली तिळगुळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या छापील पत्रिकेत म्हटले होते, “१३-१-१८५२ रोजी पुणे कलेक्टर साहेबांच्या पत्नी मिसेस जोन्स यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक तिळगूळ समारंभ होणार आहे. तरी सर्व स्त्रियांनी आपल्या लेकी-सुना घेऊन यावे. समारंभ सायंकाळी ५ वाजता आहे. कोणत्याही जातीच्या अथवा धर्माच्या बायका आल्या तरी त्या एकाच जाजमावर बसतील. जातिभेद व पक्षपात न करता सर्वांना सारखेच हळदी-कुंकू लावण्यात येईल आणि तिळगूळ वाटण्यात येईल." ही पत्रिकाच अस्पृश्यांबाबत सावित्रीबाईंचा दृष्टिकोन स्पष्ट होण्यास पुरेशी आहे. सावित्रीबाईंच्या पत्रिकेस प्रतिसाद देऊन सर्व जातींच्या स्त्रिया त्या कार्यक्रमास उपस्थित होत्या
2 ) स्त्रीमुक्तीचे कार्य : स्त्री शिक्षणाशिवाय स्त्रियांच्या उद्धाराचे मोठे कार्य सावित्रीबाईंनी केले. पुनर्विवाहास बंदी असल्यामुळे तरुण विधवा कोणाच्या तरी वासनेला बळी पडत व गरोदर राहत व त्यांच्याकडून नवजात बालकांची हत्या होई. अशी टाकून दिलेली मृत नवजात बालके जोतिराव व त्यांच्या पत्नीने पाहिली होती. म्हणून त्या दोघांनी आपल्या घरातच बालहत्या प्रतिबंधकगृह काढले व बालिकाश्रम चालविला. अर्थात हे चालविणे सोपे काम नव्हते. याच बालहत्या प्रतिबंधकगृहात काशीबाई नावाची एक ब्राह्मण विधवा आली. (ही काशीबाई पुण्याच्या नातू घराण्यातील होती) तिच्या पोटी मुलगा जन्मास आला. हाच यशवंत होय. तो फुले पती-पत्नीने दत्तक घेतल. कारण त्यांना मूल नव्हते. १० जुलै १८८७ रोजी केलेल्या त्यांच्या मृत्युपत्रात सावित्रीबाई व जोतिराव यांनी दत्तक घेतलेल्या मुलाविषयी माहिती आहे.फुले पती-पत्नीने जे बालहत्या प्रतिबंधकगृह काढले होते त्यात १८८४ पर्यंत ३५ ब्राह्मण विधवांची बाळंतपणे पार पडली होती. या बालहत्या प्रतिबंधकगृहास कोणतीही शासकीय आर्थिक मदत मिळत नव्हती फुले पती-पत्नीने यशवंतच्या होणाऱ्या बायकोस लक्ष्मी (ही ग्यानोबा कृष्णाजी ससाणे, हडपसर) हिला लग्नाच्या अगोदर काही वर्षे शिक्षणासाठी स्वत:च्या घरी पुण्यास आणून ठेवले होते. जोतिरावांच्या अग्निसंस्काराच्या वेळी त्यांचा दत्तक मुलगा यशवंत याला अग्नी • देण्याबाबत जोतिरावांच्या नातेवाइकांनी अडवणूक केली तेव्हा सावित्रीने पतीच्या चितेला अग्नी दिला. पत्नीने पतीच्या चितेला अग्नी दिल्याचे हे भारतीय इतिहासातील पहिले उदाहरण आहे.
सत्यशोधक समाजातील कार्य :२४ सप्टेंबर १८७३ रोजी म. फुले यांनी पुण्यात सत्यशोधक समाज स्थापन केला होता. म. फुल्यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाज संपला अशी हाकाटी सनातनी लोकांनी पिटली होती. पण सावित्रीबाईंनी पतीच्या मृत्यूनंतर मोठ्या हिमतीने व निष्ठेने सत्यशोधक समाजाचे कार्य चालू ठेवले. आपला दत्तकपुत्र यशवंत याचा विवाह सत्यशोधक विवाह पद्धतीनुसार करण्यात (४ फेब्रुवारी १८८९) सावित्रीबाईंचाच पुढाकार होता. कारण त्यावेळी जोतिराव हे पक्षाघाताच्या आजाराने आजारी होते. १८७६ मध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडला. या दुष्काळाची तीव्रता व भयानकता सावित्रीबाईंनी जे पत्र जोतिरावांना पाठविले होते त्यात दिसून येते. या दुष्काळात अनाथ, अपंग, निराधारांची मदत करण्यासाठी त्यांनी कँप तीन वर्षे चालवला. काही स्त्रियांची मदत घेऊन अन्न शिजवून ते दुष्काळग्रस्तांना पोहोचविले.स्त्रियांच्या केशवपनाविरुद्ध जो संप घडवून आणला त्याचे नेतृत्व नाराण मेघाजी लोखंडे यांनी केले असले तरी त्या संपाचे प्रेरणास्थान सावित्रीबाईच होत्या. २५ डिसेंबर १८७३ रोजी सीताराम आल्हाट व राधाबाई ग्यानोबा निंबणकर यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह झाला तेव्हा राधाबाई निंबणकर यांना वैचारिक व मानसिक आधार देण्याचे काम सावित्रीबाईंनी केले.१८७५-७६ या ३ वर्षांच्या सत्यशोधक समाजाच्या रिपोर्टात मित्रपक्षांच्या वर्गणीदारांच्या यादीत सावित्रीबाईंचे नाव आहे. त्यांनी २ रुपये देणगी दिल्याचा उल्लेख आहे. सत्यशोधक चळवळीच्या अनेक कामांत सावित्रीबाईंचा हात असल्याचे आता संशोधनाच्या अनुषंगाने स्पष्ट होत आहे. सासवड येथे सत्यशोधक समाजाची १८९३ मध्ये जी २० वी परिषद झाली त्याचे अध्यक्षपद सावित्रबाईंनीच भूषवले होते. १८९६ च्या दुष्काळातही त्यांनी दुष्काळग्रस्तांना मदत केली होती. १८९७ च्या प्लेगचा आजार होऊन त्यातच त्यांचे निधन झाले होते. सावित्रीबाईंचे लेखन : सावित्रीबाईंनी शैक्षणिक, सामाजिक कार्य करीत मौलिक स्वरूपाची साहित्यनिर्मिती केली ती याप्रमाणे - -
२) जोतिबांची भाषणे (संपादक), सावित्रीबाई फुले १८५६.
३) सावित्रीबाईंची जोतिबास पत्रे.
४) मातुश्री सावित्रीबाईंची भाषणे (संपादक) बाबाजी महाघट पानसरे पाटील (१८९२)
३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्र सरकार बालिका दिन म्हणून साजराकरते.
सावित्रीबाई फुलेंबद्दल अभ्यासकांचे अभिप्राय धनंजय कीर यांच्या मते - “१९व्या शतकात स्त्रियांच्या उद्धारासाठी व्यतीत केलेले सावित्रीबाईंसारखे अन्य आदर्श उदात्त उदाहरण क्वचित आढळून येईल. पंडिता रमाबाईंचे पांडित्य नि भरारी त्यांच्या ठायी नसेल; परंतु मांगल्य, धडाडी, निर्व्याज मानवता आणि भारतीय धवलता या गुणांत रमाबाई त्यांची बरोबरी करू शकल्या नाहीत." म. फुले यांचे आद्य चरित्रकार व थोर सत्यशोधक पंढरीनाथ सीताराम पाटील म्हणतात, "सावित्रीबाईंच्या भारतीय स्त्रीच्या उत्थानासाठी केलेल्या सहृदयी कार्याशी तुलना करता येणारे एकही उदाहरण १९ व्या शतकात सापडत नाही." लक्ष्मण कराडी जया हा सावित्रीबाईंचा विद्यार्थी प्रतिक्रिया नोंदवितो, "सावित्रीबाईंसारखी दयाळू व प्रेमळ अंतःकरणाची स्त्री मी अजूनसुद्धा पाहिली नाही... ती आपल्या आईपेक्षा जास्त आपल्यावर प्रेम करीत आहे. असेच त्यावेळी सर्व मुलांना वाटत होते.” डॉ. बाबा आढाव म्हणतात, "सावित्रीबाईंचे संपूर्ण जीवन क्रांतिकारक आहे." वरील अभिप्रायातून त्यांच्या अलौकिक कार्याची आपणास कल्पना येते.