ताराबाई शिंदे ‘स्त्री-पुरुष तुलना'
ताराबाई शिंदे हे नाव अगदी अलीकडे १९७५ नंतर सत्यशोधक चळवळीच्या इतिहासात नव्याने दाखल झाले आहे. ताराबाई शिंदे यांनी १८८२ मध्ये ‘स्त्री-पुरुष व 'तुलना' या नावाचे एक छोट पुस्तक लिहिले होते; पण नंतर हे पुस्तक उपलब्ध झाले ते १९७५ मध्ये. ताराबाई शिंदे यांचे वडील बापूजी हरी शिंदे हे जातीने माळी होते १८७६ मध्ये सत्यशोधक समाजाचे उपाध्यक्ष होते. त्यांचे दुसरे बंधू रामचंद्र शिंदे • कंत्राटदार होते व सत्यशोधक समाजाच्या चळवळीत भाग घेत असत. म्हणजेच ताराबाई यांच्या कुटुंबास सत्यशोधक विचारांचा व चळवळीचा वारसा होता. बापूजी शिंदे यांनी इंग्रज सरकारने ज्याप्रमाणे सतीप्रथा, कन्यावध वगैरे दुष्ट प्रथा मोडून काढल्या त्याप्रमाणे बालविवाहाची पद्धत कायद्याने मोडून काढावी व विधवांना पुनर्विवाहास परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. सक्तीच्या वैधव्यामुळे वयात आलेल्या विधवांचा पाय घसरतो व त्यातून नवजात बालकांची हत्या करण्याचे प्रकार घडतात असे मत बापूजी हरी शिंदे यांनी मांडले होते; पण याच बापूजी हरी शिंदे यांनी मात्र आपल्या ताराबाई नावाच्या मुलीचे लग्न तिला न आवडणाऱ्या मुलाशी लावून दिले. एवढेच नव्हे तर त्या विधवा झाल्यानंतर ताराबाईंना पुनर्विवाह करू दिला नाही. ताराबाईंना सक्तीच्या वैधव्याचे जीवन जगावे लागले. एक सत्यशोधक कार्यकर्ता या नात्याने बापूजी शिंदे यांनी आपल्या मुलीबाबत केलेला व्यवहार अत्यंत विसंगत व दुटप्पी असा होता. ताराबाई शिंदे यांच्या ‘स्त्री-पुरुष तुलना' या पुस्तिकेची दखल म. फुले यांनी त्यांच्या ‘सत्सार भाग-२' या छोट्या पुस्तिकेत घेतली आहे; पण इतर सत्यशोधकांनी मात्र ताराबाईंच्या या पुस्तिकेची दखल घेतली नाही. ही पुस्तिकाच दडपून टाकल्याने ताराबाईंना त्या काळातही फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. कृष्णराव भालेकरांसारख्या प्रथम दर्जाच्या सत्यशोधकानेही या पुस्तकातील विचार, मते विचारात घेतली नाहीत. भालेकरांचा या पुस्तकासंबंधी जो दृष्टिकोन होता त्याबाबत म. फुले लिहितात, “तो बोध आडमूठ वर्तमानपत्रकर्त्यास रुचला नाही. सबब, अर्थात सौ. ताराबाईंचे पुस्तक खंडन करू लागल्याने उलट आपल्याच गळ्यात त्यातील सर्व दोषांचे घोंगडे पडेल या भयास्तव राजश्रींनी (कृष्णराव भालेकर) त्या पुस्तकातील एकंदर सर्व बोधांचा धिक्कार करून त्यास कचऱ्याच्या पेटीत झोकून आपले नाक मुठीत धरून उलटी ताराबाईचीच निंदा करून तिचे उपकार फेडले.” (संदर्भ- म. फुले समग्र वाङ्मय, पृष्ठ ३७३) (संपा) य. दि. फडके.
'स्त्री-पुरुष तुलना' या ग्रंथातील विचार : ताराबाई शिंदे यांनी जेव्हा हिंदू
• स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारास तोंड फोडण्यासाठी पुस्तक लिहिले त्यावेळी म. फुले यांना आनंद झाला होता व तो त्यांनी जाहीररीत्या व्यक्तही केला होता. ताराबाईंची दृष्टी अतिशय सूक्ष्म आहे. स्त्री-पुरुष तुलना या ग्रंथात ताराबाईंनी एक सूत्र मांडले ते म्हणजे खऱ्या अर्थाने कुटिल आणि पापी, दुर्वर्तनी स्त्री नाही तर पुरुष आहे. समाजातील उच्चवर्णीय असो की शूद्रवर्णीय असोत' स्त्रिायांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी सारखीच आहे आणि ती म्हणजे स्त्रियांकडे अविश्वासाने पाहिले जाते. शतकानुशतके भारतीय स्त्रियांकडे अविश्वासाने पाहिले गेले. स्त्रिया या कुटिलतेच्या पापाच्या खाणी आहेत व त्यांच्यामुळेच पुण्यक्षय होतो असाच दृष्टिकोन भारतात विकसित झाला. वास्तविक संसाररथ व सृष्टिक्रम चालविण्यासाठी स्त्री आणि पुरुष या दोघांचीही आवश्यकता आहे. किंबहुना पुरुषांना निर्माण करणाऱ्या सृष्टिकर्त्याने स्त्रियांनाही निर्माण केले आहे. तेव्हा पुरुषांसारखेच स्त्रीचेही स्थान असले पाहिजे. कारण दोघेही एकमेकांस पूरक व अपरिहार्य आहेत असे त्या म्हणतात. त्यांनी या पुस्तिकेच्या प्रस्तावनेचा प्रारंभही या मुद्याने केला आहे.
२) अन्यायाच्या मुळाशी अज्ञान व पुरुषी अहंकार : स्त्री व पुरुष हे एकमेकांना पूरक असतील, अपरिहार्य असतील तर स्त्रियांवरच अन्याय का होतात? या प्रश्नाचे उत्तर त्यांना सापडते ते पुरुषी वर्चस्वामध्ये व स्त्रियांच्या अज्ञानामध्ये. स्त्रियांना शतकानुशतके केवळ डांबून ठेवण्यात आले आहे. त्यांना कोणताच अनुभव येऊ दिला नाही, शिक्षण मिळू दिले नाही. त्यामुळे स्त्रियांमधील अंधश्रद्धा व अज्ञान वाढले असे मत त्या नोंदवतात. या अज्ञानामुळे स्त्रिया भूलथापांना कशा बळी पडतात याची काही उदाहरणे त्या देतात. स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाच्या मुळाशी ज्याप्रमाणे अज्ञान आहे तसेच पुरुषी अहंकारही आहे. किंबहुना या पुरुषी अहंकारनेच स्त्रियांना अज्ञानात ठेवले आहे असे त्यांना वाटे.
३) पुनर्विवाह समाजसुधारणेसाठी आवश्यक : प्राचीन काळात पुनर्विवाह रूढ होते. यासंदर्भात ताराबाईंनी काही उदाहरणे दिली आहेत. पराशरांबरोबर संबंध येऊन मत्स्यगंधेस मुलगा झाला व तिने पुढे शंतनुबरोबर लग्न केले. कुंतीलाही कौमार्यादशेतच मुलगा झाला होता. तिचाही विवाह पांडूबरोबर झाला. म्हणजे पुनर्विवाहच झाला. तारेचा सुग्रीवाबरोबर रामाच्या सल्ल्यानेच दुसरा विवाह झाला होता. ही सर्व उदाहरणे असताना अलीकडेच पुनर्विवाहास का बंदी? असा प्रश्न त्या उपस्थित करतात. पुनर्विवाहास परवानगी मिळाल्याशिवाय आपला समाज सुधारणार नाही असे मत त्या नोंदवतात. पुनर्विवाह ब्राह्मणांतच होत नाहीत असे नाही. प्रभू, शेणवी, गुजराथी, भाटे, मारवाडी, मराठे, देसाई, देशमुख, इनामदार, जहागीरदार, शिर्के, महाडिक, जाधव, भोसले, माने इ. आडनावांच्या कुटुंबांतही पुनर्विवाहास परवानगी नाही या वास्तवतेकडे त्या लक्ष वेधू इच्छितात. पुनर्विवाह न करण्याची पद्धत अनेक जातीत महारोगाप्रमाणे पसरली असून कोट्यवधी स्त्रिया वैधव्याचे दुःख भोगत आहेत याबद्दल तीव्र खंत त्या पुनः पुन्हा व्यक्त करतात.
४) नवऱ्याआधी बायकोने मरावे ही खुळचट कल्पना : नवऱ्याआधी बायकोने मरावे ही भारतीय जनमानसात रूढ झालेली कल्पना अत्यंत खुळचट आह. मृत्यू हा • सर्व शक्तिमान परमेश्वराच्या हाती आहे. एखाद्या स्त्रीचा पती मृत्यू पावला म्हणून तिने अरण्यवासात का राहू अंधारकोठडीत राहावे ही समाजाची धारणा अत्यंत चुकीची आहे. बायको मृत्यू पावली । म्हणून आपले तोंड काळे करून, दाढीमिशा वाढवून पुरुषाने ● नये? असा प्रश्न ताराबाई उपस्थित करतात. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर १५ दिवसांनीच दुसरे लग्न करण्याच्या पुरुषांच्या कृतीवर त्यांनी टीकास्त्र सोडले आहे.
५) सक्तीचे वैधव्यपण- भयंकर शिक्षा : पतीच्या मृत्यूनंतर विधवा स्त्रीची काय स्थिती होते हे ताराबाईने अत्यंत सूक्ष्मपणे मांडले आहे. विधवांना केस काढावे लागतात, अलंकार वापरता येत नाहीत, लग्नकार्यात सभारंभात जाता येत नाही, तिचे दर्शन अपशकुन मानले जाते. पती निधनासाठी विधवेला कारणीभूत धरले जाते. तिला ‘हरी हरी, देव देव' करीत बसावे लागते. विधवेला घरच्या-दारच्यांचा जाच सहन करावा लागतो. हे वास्तव मांडून विधवेलाही पुनर्विवाहाची परवानगी हवी असा विचार ताराबाई आग्रहाने मांडतात. ८० वर्षांची म्हतारी माणसे ज्यांच्या तोंडात दात नाहीत, डोक्यावर केस नाहीत, अंगात शक्ती नाही तरीही दोन हजार रुपये मुलीच्या वडिलास देऊन पुनर्विवाह करतात. या तत्कालीन वास्तवतेकडे ताराबाईंनी लक्ष वेधले आहे. एखाद्याची बायको आजारी पडली तर नवरा म्हणतो, “औषध देऊन कंटाळलो, ही कधी मरेल हो’” पती नवऱ्याची आजारपणात शुश्रूषा करणाऱ्या स्त्रीच्या मनात मात्र पतीच्या मृत्यूचा कधी विचारही येत नाही असेही ताराबाई निरीक्षण मांडतात.
६) श्रीमंताच्या बहुपत्नीत्व प्रथेवर हल्ला : पुरुषांना ज्याप्रमाणे वाईट, कुरूप, दुर्गुणी, घाणेरडी, गावंढळ बायको आवडत नाही त्याचप्रमाणे स्त्रीलाही या पद्धतीचा नवरा आवडत नाही. अगदी लहान वयातच मुले आई-वडिलांच्या आग्रहाखातर लग्ने करून घेतात; पण पुढे शिकून मोठा हुद्दा मिळाल्यावर त्या पुरुषाला पहिल्या बायकोची लाज वाटते व ते पुन्हा लग्न करतात. आवडता कुत्रा किंवा घोडी यांच्यावर जेवढे असते तेवढेही बायकोवर नसते. "श्रीमंत तर दररोज नवरे होण्याला तयार असतात” असा टोला मारून हुद्दा व पैशाच्या जोरावर पुन्हा लग्न करण्याच्या पुरुषांच्या वृत्तीवर ताराबाई टीकेचे आसूड ओढतात.
७) स्त्रियांत कमी दोष आहेत व पुरुषांत जास्त दोष आहेत: स्त्रियांत जसे दोष आहेत तसे पुरुषांतही आहेत. चोरी, लबाडी, शिंदळकी, खून, दगाबाजी, ला घेणे वगैरे दुर्गुण हे फक्त स्त्रियांतच आहेत असे नव्हे तर पुरुषांतही आहेत. स्त्रिया म्हणजे अविचारी कर्माचे नगरच होत, स्त्रिया म्हणजे गोठ्यातील म्हशीप्रमाणे मूर्ख असा समज काढून टाकला पाहिजे. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषच तुरुंगात मोठ्या प्रमाण असतात. याचा अर्थ पुरुषांत जास्त दोष आहेत असा होतो. बंड, विषप्रयोग, राजद्रोह, खोटी • साक्ष, खून इ. गुन्हे करण्यात पुरुषांचा पुढाकार असतो. यापैकी कोणताही अविचार भारतीय स्त्रियांचा इतिहास व स्त्री जीवन स्त्रियांच्या हातून घडत नाही. तुरुंगात ३००० जर पुरुष असतील तर त्यात स्त्रियांची संख्या १०० सुद्धा नसते अशी आकडेवारी त्या देतात. स्त्रिया लबाडी करत नाहीत, स्त्रिया कधी रस्त्यात तमाशे पाहत नाहीत, दारू पिऊन रस्त्यात लोळत नाहीत, लुटारूंच्या टोळ्यांत स्त्रिया नसतात हे वास्तव्य त्या मांडतात. स्त्रियांचे हृदय अति कोमल व प्रीतीने भरलेले असते, स्त्रियांची प्रीती समुद्रासारखी खोल आहे. याउलट पुरुष मात्र एकीची दुर्दशा करून दुसरीच्या मागे लागतात अशी तफावत त्या मांडतात. स्त्रियांच्या पायी दुर्दशा होऊन देशोधडीस लागलेले पुरुष सापडतील, याउलट स्त्रिया मात्र फारशा सापडणार नाहीत. पुरुष म्हणजे भ्रमर. या फुलावरून त्या फुलावर उडत फिरतो; पण स्त्री जाती तशी नाही असे मत त्या मांडतात.
८) स्त्रियांवाचून पुरुषाला शोभा नाही : "स्त्रीजाती एक प्रतिशक्तीच आहे. तिच्यावाचून तुम्हाला शोभा, मोठेपणा, जय हे काहीच नाही. दूर कशाला? ज्या घरात ती नाही ते घर केवळ स्मशानासारखे ओसाड दिसते. तो एक मोठा सर्व संपत्तीने भरलेला राजवाडा का असेना त्याला तीच कळा” या शब्दांत स्त्रीचे मोठेपण त्या सांगतात. स्त्रियांना लक्ष्मी म्हटले जाते. ज्या ब्रह्मदेवाने ही स्त्रीरूपी अमृततुल्य सर्व पुरुषमात्रास मोहरूपाने बंधन घालणारा प्राणी उत्पन्न केला त्याबद्दल त्यास दोष न देता उपकार मानणे आवश्यक आहे, असे आवाहन ताराबाई करतात. पुरुषांनीच प्रथम सदाचाराने वागावे म्हणजे सर्व सुखच सुख व आनंदच आनंद होईल व जगात घरोघर निष्कलंक पातिव्रत्याचे निशाण उंच फडकताना दिसेल असे त्यांना वाटत होते.
९) बाला-जरठ विवाहावर टीका : केवळ श्रीमंती पाहून ८०-९० वर्षांच्या श्रीमंत म्हाताऱ्यास पैसा घेऊन आपली मुलगी देणाऱ्या बापमंडळीवर ताराबाई कडाडून हल्ला करतात. तसेच सवतीवर मुलगी देणाऱ्यावरही आसूड ओढतात. सवतीसारखे स्त्रियांस निरंतर काट्यांप्रमाणे सलणारे दुसरे शस्त्रच नाही असे त्या लिहितात. बायकांनी नवऱ्यास देव मानायला त्यांची हरकत नाही; पण नवऱ्यांनीही देवासारखे राहिले पाहिजे ही त्यांची प्रमुख अट आहे. स्त्रिया पुरुषांसाठी पुष्कळ करतात; पण पुरुष त्यांच्यासाठी किती करतात? हा प्रश्न त्या उपस्थित करतात.
मूल्यांकन लढ्याला पूरक होणारीच भूमिका ताराबाईंनी घेतली होती. ताराबाईंचे लेखन हे तत्कालीन : म. फुले यांनी स्त्री-पुरुष विषमतेविरुद्ध जो लढा पुकारला त्या समाजाला हादरवून सोडणारे होते. अस्वस्थ करणारे होते. पुरुषी वर्चस्वावर त्यांनी घणाघाती हल्ले केले. 'स्त्री-पुरुष तुलना' हा छोटा ग्रंथ वाचताना लक्षात येते की, ताराबाई त्याकाळाच्या तुलनेत खूपच वाचन करणाऱ्या, विचार करणाऱ्या असाव्यात. ताराबाईंच्या लेखनाची मराठी साहित्यात १०० वर्षे उपेक्षा झाली. बुद्धिप्रामाण्यवादी विचारसरणी, तर्ककठोर चिकित्सा व निर्भीड मीमांसा ही ताराबाईची वैशिष्ट्ये होती.