पंडिता रमाबाई-पूर्वचरित्र : २३ एप्रिल १८५८ रोजी पंडिता रमाबाईंचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अनंतशास्त्री व आईचे नाव लक्ष्मीबाई. त्यांचा जन्म डोंगरे नावाच्या चित्पावन ब्राह्मण कुळात झाला. अनंतशास्त्री यांनी आपली पत्नी व मुलगी यांना संस्कृत शिकविले म्हणून त्यांना छळ सोसावा लागला. गाव सोडल्यानंतर सर्व हिंदुस्थानात तीर्थयात्रा करत १५ १६ वर्षांनी हे कुटुंब मद्रास इलाख्यात आले. पण मद्रास प्रांतात भयंकर दुष्काळ पडला होता. या दुष्काळात रमाबाईंचे आईवडील व थोरली बहीण मृत्युमुखी पडले. रमाबाई व तिचा थोरला भाऊ प्रवास करत करत कोलकाता शहरात आले. तेथे मात्र त्या दोघांच्याही विद्वत्तेचे सार्थकच झाले. कोलकाता शहरातील ब्राह्मो समाजाचे पुढारी व कोलकाता विश्वविद्यालयातील पंडितांनी त्यांची कदर केली. त्याना सन्मानाने विद्यापीठात निमंत्रण दिले. रमाबाईंना ‘पंडिता सरस्वती' हे बिरुद दिले. पंडिता रमाबाईंचा विवाह व वैधव्य : आपले बंधूचे मित्र विपिन बिहारीदास मेघावी या बंगाली पण शूद्र व्यक्तीशी रमाबाईचा विवाह नोंदणी पद्धतीने (१८८०) झाला. पंडिता रमाबाई या चित्पावन ब्राह्मण तर पती दलित. एका अर्थाने हा प्रतिलोम विवाह होता. दुर्दैवाने तिचे पती-विपिन बिहारीदास हे लग्नानंतर दीड वर्षाच्या आतच मृत्यू पावले. पंडिता रमाबाईला मनोरमा नावाची एक कन्या झाली होती. पती निधनानंतर सासरी राहणे शक्यच नव्हते. या कन्येस घेऊन त्या महाराष्ट्रात परत आल्या. पुणे व त्याचा परिसर हीच त्यांची कर्मभूमी ठरली. पंडिता रमाबाईंचा पुण्यास येण्याचा हेतू इंग्रजी शिकण्याचा होता. स्वतः त्यांनी इंग्रजीचा अभ्यास खासगी रीतीने सुरू केला होता. पंडिता रमाबाई या उत्तम वक्त्या होत्या. विषय प्रतिपादन करण्याची त्यांची शैली उत्तम होती. श्रोत्यांचे मन आपल्याकडे आकर्षित करून घेण्याची विलक्षण हातोटी होती. त्या जेव्हा पुण्यास आल्या तेव्हा पुणे शहरातील जुन्या वा नव्या शिक्षणेच्छू विद्वानांना पंडिता रमाबाईंचे कौतुक वाटू पुण्यात दर आठवड्याला त्यांची व्याख्याने होत असत. या व्याख्यानांना पुरुषांना लागले. यावयाचे असेल तर त्याने आपली पत्नी, मुलगी, सून, बहीण, भावजय कोणास तरी सोबत आणावे असे त्या म्हणत. आपल्या व्याख्यानांतून त्या स्त्रियांची निरक्षरता, स्त्रीदास्य, स्त्रियांचे हक्क या विषयांवर बोलत. या व्याख्यानांमुळे त्यांचा लौकिक वाढत गेला.
सार्वजनिक कार्य :
१) आर्य महिला समाजाची स्थापना : आर्य महिला समाजाचे वेध रमाबाई येण्यापूर्वीच पुण्या मुंबईस लागले होते. ३० एप्रिल १८८२ रोजी पुण्यात ‘आर्य महिला समाज' ही संस्था स्थापन केली. त्यानंतर सोलापूर, पंढरपूर येथेही समाजाच्या शाखा निघाल्या. तसेच अहमदनगर, ठाणे येथे आर्य महिला समाज या संस्थेच्या शाखा काढण्यात रमाबाईंचा पुढाकार होता. २५ नोव्हेंबर १८८२ रोजी मुंबई येथे ‘आर्य महिला समाजाचे उद्देश' या विषयावर त्यांनी तासभर व्याख्यान दिले व पुढे ५ दिवसांनी मुंबई शहरात आर्य महिला समाजाची स्थापना झाली. स्त्रियांचे ज्ञान वाढवावे, स्त्रियांना कोणत्याही विषयाचा विचार करण्याची व आपले विचार बोलून दाखविण्याची सवय लागावी. नीती, सन्मार्ग व धर्म यांचा सामान्य बोध व्हावा, एकूण स्त्रियांची स्थिती सुधारावी हा आर्य महिला समाज स्थापनेचा हेतू होता.
२) हंटर कमिशनपुढे पंडिता रमाबाईंची साक्ष (१८८२) : सर डब्ल्यू. डब्ल्यू. हंटर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणाची चौकशी करण्यासाठी एक कमिशन पुण्यात आले होते. आर्य महिला समाजाच्या वतीने या कमिशनचे स्वागत करण्याचे ठरविले. कमिशनच्या स्वागत समारंभात पंडिता रमाबाईंनी खानेसुमारीतील आकडेवारींचे साहाय्य घेऊन दणदणीत भाषण दिले. ब्रिटिश सत्तेखाली असलेल्या ९ कोटी ९७ लक्ष स्त्रियांपैकी फक्त ९,९५,००० एवढ्याच स्त्रिया साक्षर आहेत. ही आकडेवारी देऊन एकूण स्त्री शिक्षणाची स्थिती भाषणात मांडली. हंटर कमिशनपुढे पंडिता रमाबाईंची साक्ष झाली. त्यावेळी त्यांनी खालील मागण्या केल्या होत्या.
१) मुलांच्या शाळेतील शिक्षकांपेक्षा मुलींच्या शाळेतील अध्यापिकांना जास्त पगार द्यावा.
२) मुलींची राहण्याची सोय वसतिगृहातच असावी व वसितगृहे सर्व उपकरणांनी सुसज्ज असावीत.
३) मुलींच्या शाळा तपासण्याचे काम स्त्री इन्स्पेक्टरांनीच करावे.
४) हिंदुस्थानात स्त्री डॉक्टरांची उणीव आहे ती दूर व्हावी.
५) स्त्रियांना वैद्यकीय शिक्षण देण्याची व्यवस्था व्हावी
६) स्त्रियांना शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या द्याव्यात
या साक्षीमुळे सरकार दरबारी पंडिता रमाबाईंचे वजन वाढले. पंडिता रमाबाईंच्या साक्षीचे इंग्रजी भाषांतर सर हंटर यांनी करवून घेतले. हे भाषण व्हिक्टोरिया राणीच्या • वाचण्यात येऊन स्त्रियांचे वैद्यकीय शिक्षण, स्त्रियांसाठी दवाखाने आदी बाबतीत प्रत्यक्ष निर्णय घेतले गेले.
(३) शारदा सदन स्थापनेची कल्पना : १८८१ च्या शिरगणतीनुसार भारताची * लोकसंख्या २० कोटी होती. विधवा स्त्रियांची लोकसंख्या २,३०,००,००० एवढी होती व त्यातही बालविधवांचे प्रमाण जास्त होते. विधवांचे हे प्रमाण व बालविधवांची संख्या पाहून पंडिता रमाबाईंचे मन चिंतित झाले. त्यांनी स्त्रियांच्या व विशेषतः अनाथ दुर्दैवी स्त्रियांच्या सेवेला वाहून घेण्याचे ठरविले व त्यासाठी त्यांनी पुणे, मुंबई, अहमदाबाद • येथील पुढारी व धनिकांच्या भेटी घेतल्या. संस्था काढण्याचा विचार बोलून दाखविला त्याला पण प्रतिसाद मिळाला नाही.
४) ख्रिश्चन धर्माचा स्वीकार आणि इंग्लंडला वास्तव्य (१८८३-८७): शेवटी डॉक्टर व्हायचे व मायाबहिणीची सेवा करायची असा विचार करून त्या लंडनला गेल्या. आपली २ वर्षांची कन्या घेऊन त्या बोटीने इंग्लंडला १७ मे १८८३ रोजी पोहोचल्या. तेथे त्यांनी ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली. पंडिता रमाबाईंनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याची बातमी येताच सर्वत्र खळबळ उडाली. ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यापूर्वीच ४ वर्षे त्यांनी हिंदू धर्माचा त्याग केला होता. 'केसरी' पत्राने ११ सप्टेंबर १८९३ च्या अंकात लिहिले, “पंडिता रमाबाईंनी धर्मांतर केले हे आमचे दुर्दैव होय. तथापि तेवढ्याच कारणासाठी आपण त्यांना टाकून द्यावे हे उचित होणार नाही. ख्रिश्चन धर्मप्रचारार्थ त्यांनी प्रयत्न चालविला नाही. त्यांनी हाती घेतलेल्या कार्यास साहाय्य न करणे हे आत्मघाताचे ठरेल.” मुंबई पुण्यातील साप्ताहिक पत्रांनी पंडिता रमाबाईंच्या ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याच्या निर्णयाचा निषेधच केला. पण त्या निर्णयामुळे व त्यांच्या विद्वत्तेमुळे त्यांचे नाव भारतभर झाले होते. ‘शारदा सदन' ही संस्था पंडिता रमाबाईंनी ख्रिश्चन झाल्यावर साडेपाच वर्षांनी काढली. शारदा सदन मुंबईहून पुण्यास नेण्याचे ठरले. पंडिता रमाबाई ख्रिश्चन का झाल्या हे कोडे हिंदू, प्रार्थना समाजीयांपुढे तसेच ख्रिस्ती लोकांच्या पुढे होते. ख्रिस्ती लोकांना विषाद वाटत होता की, त्या ख्रिस्ती समाजाविषयी उदास होत्या. म्हणून शारदा सदनात ख्रिस्ती धर्मशिक्षण देण्यात येत नव्हते. स्वतः पंडिता रमाबाईंनी एक पत्र 'सुबोध पत्रिका' साप्ताहिकात ‘मी ख्रिश्चन धर्म का घेतला?' या शीर्षकाचा लेख लिहून खुलासा केला होता. त्यात त्या म्हणतात, “ख्रिस्ताचा उपदेश म्हणून बायबलमध्ये जो भाग आहे त्यात खरोखरच अनादी सत्य पूर्णत्वास पावले आहे. ख्रिस्ताने सांगितलेला व आचारि धर्म आपणास सर्वोत्तम व निर्दोष वाटतो. ख्रिस्ताचा उपदेश हा परमेश्वराकडून आला आहे याबद्दल माझा अंतरात्मा साक्ष देतो." इंग्लंडमधील वास्तव्यात त्या छानपैकी इंग्रजी बोलायला शिकल्या.
५) रमाबाईंचे अमेरिकेतील वास्तव्य १८८३ ते १८८९ : १७ फेब्रुवारी १८८६ रोजी पंडिता रमाबाईंनी इंग्लंड सोडले व ६ मार्च १८८६ रोजी त्या अमेरिकेला पोहोचल्या. ११ मार्चला त्या आनंदीबाई जोशींच्या पदवीदान समारंभास हजर होत्या. इंग्लंडप्रमाणेच अमेरिकेत गेल्यावरही तेथील स्त्रियांनी केलेली प्रगती, स्त्रियांचे शिक्षण, स्त्रियांचा सामाजिक दर्जा हे पाहून त्या आश्चर्यचकित झाल्या. अमेरिकन संस्था, अमेरिकेतील स्त्रिया, तेथील चर्च, शिक्षण आदींचा अत्यंत बारकाईने व सर्व बाजूंनी रमाबाईंनी अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी ३०,००० मैलांचा प्रवास केला.
६) रमाबाई असोसिएशन व तिचे कार्य (१३ डिसेंबर १८८७) : अमेरिकेतील स्त्री-पुरुषांत रमाबाईंनी हिंदुस्थानच्या बालविधवांबद्दल इतकी कमालीची सहानुभूती उत्पन्न केली की, त्यांच्या कार्याला मदत करण्यासाठी 'रमाबाई असोसिएशन' नावाची संस्था काढण्यात आली. त्यांच्या कार्यासाठी रमाबाईंना प्रारंभीचा खर्च देऊन पुढे १० वर्षे दरवर्षी पैशाची मदत करण्याचे मान्य केले होते. १० डिसेंबर १८८७ रोजी बोस्टन शहरातील एका सभेत त्यांनी हिंदुस्थानातील विधवांची करुण कहाणी सांगितली. नंतर अनेक भाषणे होऊन 'रमाबाई असोसिएशन' त्यादिवशी स्थापन झाले. या असोसिएशनमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, चिटणीस ही पदे होती व विश्वस्त मंडळ, सल्लागार मंडळ व कार्यकारी मंडळ ही मंडळे असतील. या असोसिएशनची वार्षिक सभा डिसेंबरमध्ये दरवर्षी होईल. घटनेत बदल करण्याचा अधिकार वार्षिक सर्वसाधारण सभेला असेल. विश्वस्त मंडळाच्या बैठका वर्षातून दोनदा व कार्यकारी मंडळाची बैठक दरमहा भरेल. असोसिएशनचे सभासद १० वर्षांपर्यंत दरसाल कमीत कमी एक डॉलर वर्गणी देण्यास बांधील आहेत वगैरे नियम असलेली घटनाही तयार करण्यात आली होती. २६ जुलै १८८८ रोजी The Ramabai Association of Pacific Cost नावाची संस्था काढून पश्चिम अमेरिकेतील लोकांनी रमाबाईच्या कार्यास हातभार लावण्यास प्रारंभ केला. या संस्थेच्या स्थापनेनंतर (१३ डिसेंबर १८८७) ८-१० दिवसांनी ‘न्यूयॉर्क इन्हॅन्जेलिस्ट' पत्रात 'फिबी' हे टोपणनाव घेऊन कोणी तरी एक पत्र लिहिले. पंडिता रमाबाईंच्या कार्यास काही अडथळा येतो की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. पण रमाबाईंनी त्या पत्रास ताबडतोब उत्तर दिले. रमाबाई असोसिएशन ही मिशनरी संस्था नव्हती. त्यामुळे अमेरिकेतील मिशनरीधार्जिण्या लोकांनी व संस्थांनी तिला कसून विरोध केला. 'रमाबाई असोसिएशन' बंद होऊन त्याऐवजी 'अमेरिकन रमाबाई असोसिएशन' नावाची संस्था स्थापण्यात आली व ती फक्त केडगावातील शारदा सदन या संस्थेशीच निगडित होती.
७) भारतात आगमन व शारदा सदन या संस्थेच्या कार्यातील योगदान : १८८९ च्या फेब्रुवारीत पंडिता रमाबाई अमेरिकेहून कोलकात्याला आल्या. मुंबईत त्यांनी ११ मार्च १८८९ रोजी विल्सन कॉलेजच्या जवळ 'शारदा सदन' स्थापन केले. या शारदा सदनमध्ये पहिली मुलगी आली तिचे नाव शारदा गद्रे होते. असे म्हणतात की, याच मुलीच्या नावावरून 'शरदा सदन हे नाव ठेवण्यात आले. शारदा गद्रे ही बालविधवा नव्हती तर पुनर्विवाहित बालविधवेची मुलगी होती. पहिल्या ६ महिन्यांत ५ विधवा वसतिगृहात राहण्यासाठी आल्या. ३ बाहेरून येत. १७ कुमारिका ५ • शाळेत होत्या. शारदा सदन हे बालविधवांसाठी होते; पण विधवा मुली शिक्षणासाठी पालक पाठवत नव्हते. ही स्थिती मुंबईसारख्या शहरात होती. आनंदीबाई कर्वे (ज्या बालविधवा येणाऱ्या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या.) या विधवेने म्हणून पुढे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याशी पुनर्विवाह केला. पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनसाठी अमेरिकेतून रमाबाई असोसिएशन पैसा पाठवी. १० वर्षांपर्यंत मदत करण्याचे असोसिएशनने ठरविले होते. प्रत्येक मुलीमागे १० पौंड वार्षिक खर्च ही संस्था पाठवी मंडळी असे आनंदीबाई कर्वे सांगतात. पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले होते. त्यात न्या. रानडे, डॉ. आर. जी. भांडारकर, न्या. के. टी. तेलंग, कृष्णाजी लक्ष्मण नूलकर इ. होती. दीड वर्षानंतर म्हणजे नोव्हेंबर १८९० मध्ये शारदा सदन मुंबईहून पुण्यास आणण्यात आले. पुण्यास शारदा सदन आल्यानंतर विद्यार्थिनींची संख्या ६४ झाली झाली. त्यात दुर्गाबाई किर्लोस्कर, काशीबाई देवधर, वेणूबाई नामजोशी या होत्या. (या तिघींनी पुढे हिंगण्याच्या अनाथाश्रमात काम केले). पुण्यात चांगल्या वस्तीमध्ये एक बंगला भाड्याने घेऊन तेथे या मुली ठेवल्या होत्या. तेथे मुलींच्या खाण्यापिण्याची कधी आबाळ झाली नाही. १८९२ मध्ये 'शारदा सदन' स्वतःच्या मालकीच्या इमारतीत गेले. या इमारतीचे उद्घाटन २६ जुलै १८९२ रोजी डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांच्या उपस्थितीत झाले. शारदा सदनमधील मुलींना पंडिता रमाबाई अत्यंत प्रेमाची वागणूक देत. पुण्यास आल्यापासून शारदा सदनची चांगलीच भरभराट झाली. आपल्या नात्यातील ४ विधवांचा शोध घेऊन पंड़िता रमाबाईंनी त्यांना शारदा सदनात दाखल केले होते. पुणे शहर व परिसरातील अनेक बालविधवांचा शोध घेऊन पंडिता रमाबाईंनी त्यांना आपल्या आश्रमात दाखल करून घेतले होते. मुलींना पंडिता रमाबाई आपल्या आईच वाटायच्या. इ.स. १८९३ मध्ये एक वादळ उठले ते म्हणजे पंडित रमाबाई नावाची एक राक्षसीण शारदाश्रमातील विधवांना ख्रिश्चन धर्माची दीक्षा देत आहे. शारदा सदनच्या सल्लागार मंडळांपैकी डॉ. भांडारकर, न्या. रानडे, चिंतामण नारायण भट या तिघांनी सल्लागार मंडळाचे राजीनामे दिले व शारदा सदनशी संबंध तोडला. शारदा सदनमधील मुलींना खासगी प्रार्थनेला हजर राहण्यास व बायबल वाचण्यास उत्तेजन देण्यात येते व तेथे ख्रिश्चन धर्मतत्त्वांचे शिक्षण व मुलींना बाटविण्याचे काम तेथे होते आहे असे वरील तिघांचे मत बनले होते. वरील तिघांनी आपल्या सह्यांनिशी एक पत्रक काढून शारदा सदनात मुली पाठवू नयेत असे आवाहन केले. त्याचा परिणाम म्हणून २५ मुली शारदा सदनातून काढून घेण्यात आल्या. त्यापैकी १६ विधवा होत्या. त्यापैकी १२ जणींना पुण्यातील फिमेल हायस्कूल (सध्याचे चिंतामणराव पटवर्धन दाखल. हायस्कूल) येथे केले गेले. विशेष गोष्ट म्हणजे याच वेळी न्या. रानडे यांच्या पत्नीने एका अनाथ बालविधवेला शारदा सदनमध्ये दाखल करण्यासाठी आणले होते. गोपाळराव जोशी व वासुदेव गणेश जोशी (सार्वजनिक काका) या दोघांनी याच वेळी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनला जणू आव्हानच दिले होते. याच दोघांनी पंडिता रमाबाई बंगलोरला गेल्याचे निमित्त पाहून तुळशीच्या कुंड्या शारदा सदनमधील हिंदू मुलींसाठी म्हणून पाठवून दिल्या. पण पंडिता रमाबाई बंगलोरहून परत येताच त्या काढावयास लावल्या. वास्तविक ते खरे नव्हते. पंडिता रमाबाईंनी 'केसरी'त पत्र प्रकाशित करून खुलासा केला, “जी गोष्ट ख्रिश्चन धर्माविरुद्ध आहे ती त्यांच्याच पैशाने चालविलेल्या सदनाला करू देणे रास्त होणार नाही." तरीही संबंधितांचे समाधान झाले नाही. शारदा सदनच्या व्यवस्थापकांपैकी एक रावबहादूर नूलकर यांनीही शारदा सदनचा संबंध तोडला. रमाबाई असोसिएशनला फक्त १० वर्षांसाठीच अमेरिकेतून मदत येणार होती. नंतर मदत मिळण्याची शक्यता कमी होती म्हणून पुण्यापासून ३४ मैल अंतरावर केडगाव या ठिकाणी १०० एकर बरड जमीन पंडिता रमाबाईंनी खरेदी केली होती. हेतू हा की तेथे जाऊन शेती वगैरे करून मुलींचे संगोपन करावे. १८९७ मध्ये जेव्हा पुण्यात प्लेगची साथ आली तेव्हा केडगावला झोपड्या बांधून शारदा सदनचे अर्धे काम हलवले. गुलबर्गा येथे मुलीसाठी एक शाळा रमाबाईंनी काढली होती. आचार्य अत्रे यांनी २१ एप्रिल १९६३ च्या मराठात लिहिले, ``Ramabai & illumainating and inspiring life stands like lighthouse leading and guiding the people of India."
पंडिता रमाबाईंची इतर कामे :
• या ग्रंथात पंडिता रमाबाईंनी हिंदी राष्ट्रभाषा असावी असे आग्रहाने म्हटले आहे. राष्ट्रीय
१) हिंदी राष्ट्रभाषा असावी : 'युनायटेड स्टेटसूची लोकस्थिती व प्रवासवर्णन' . सभेत (काँग्रेस)च्या अधिवेशनात इंग्रजीतूनच व्याख्याने होतात याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी त्या चळवळीत अमेरिकेत असतानाच भाग घेतला होता. भाषणे दिली.
२) मद्यपाननिषेधक स्त्री मंडळ : या मंडळाच्या रमाबाई सक्रिय सदस्य होत्या. १८८९ मध्ये मुंबईच्या काँग्रेस अधिवेशनाला ८ स्त्री प्रतिनिधी (१८८९ प्रतिनिधींपैकी) होते. त्यापैकी ४ स्त्री प्रतिनिधी आर्य महिला समाजाच्या होत्या तर ४ मद्यपान निषेधक
३) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ५ व्या अधिवेशनातील सहभाग : इ.स. स्त्री मंडळाच्या होत्या. विशेष म्हणजे या दोन्ही संस्था पंडिता रमाबाईंच्या नेतृत्वाखाली काम करत होत्या.
४) सामाजिक परिषदेतील सहभाग : काँग्रेसबरोबरच व त्याच मंडपात सामाजिक या परिषद भरत असे. मुंबईस काँग्रेसचे अधिवेशन संपताच त्याच मंडपात सामाजिक परिषद | भरत असे. २९ डिसेंबर १८८९ रोजी अशी तिसरी सामाजिक परिषद भरली. परिषदेला ४००० श्रोते उपस्थित होते. परिषदेत विधवा केशवपनास बंदी असावी असा ठराव श्री. सुब्रह्मण्यम अय्यर यांनी मांडला. पंडिता रमाबाईंनी त्यास अनुमोदन देणारे भाषण केले होते. त्यात त्यांनी ही प्रथा बंद करण्याचे कळकळीचे आवाहन केले होते.
५) मध्य प्रदेश व गुजरात दुष्काळग्रस्तांना मदत : १८९७ मध्ये मध्य प्रदेशातील दुष्काळग्रस्त भागाचा त्यांनी दौरा केला. तेथील स्थिती पाहून त्या दु:खी झाल्या. तेथे त्यांनी रिलिफ कॅम्प उभारले. त्याचबरोबर ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराचेही काम केले. त्यांनी शेकडो मुलींना ख्रिश्चन धर्माची दीक्षा दिली (१२०० पेक्षाही अधिक). १९०२ मध्ये गुजरातमध्ये दुष्काळ पडला तेव्हाही ८ जणींना पाठवून दुष्काळाच्या खाईतून १३५० स्त्रिया व मुले त्यांनी केडगावला आणली.
६) केडगाव येथे मुक्ती सदन, कृपा सदन व प्रीतिसदनची स्थापना - केडगाव हे पुणे-सोलापूर रस्त्यावर आहे. केडगाव येथे २००० माणसे बसू शकतील एवढे उपासना मंदिर आहे. बाजूलाच एक दवाखाना आहे. तेथे विहिरी खोदून मुबलक पाण्याची सोयही केली गेली. कृपासदनमध्ये पाऊल वाकडे पडलेल्या व जगास तोंड दाखवण्यास जागा नाही अशा स्त्रियांना आश्रय दिला जातो. प्रीतिसदनमध्ये वृद्ध, अशक्त, लंगडे व लुळे यांना आश्रय दिला जातो. आंधळ्यांसाठी 'बार्तमी सदन' आहे. या सर्व इमारतींची उभारणी केडगाव येथे पंडिता रमाबाईंनी केली होती. पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने 'कैसर-ए-हिंद' हा किताब दिला होता. पंडिता रमाबाईंच्या नीतिमत्तेबद्दल तर त्यांच्या कट्टर शत्रूनेही कधी अवाक्षर काढले नाही. लग्नापूर्वी व वैधव्यदशेत त्यांच्या चारित्र्याविषयी कुणी शंका घेतली नाही. एरवी त्यांचे पाऊल वाकडे पडले असते तर त्यांचा खराबा झाला असता व त्यांना समाजातून उठावे लागले असते. बाईंनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला; पण त्यांच्या अंगाचा हिंदूपणा नष्ट झाला नाही. त्यांचा स्वभाव अत्यंत करारी व धडाडीचा होता. इंग्लंड-अमेरिकेसारख्या थंड देशांत त्यांनी मांस-अंडी खाल्ली नाहीत. सर्व आयुष्यात कांदा-लसणाला केला नाही. स्पर्श देवदत्त नारायण टिळक 'महाराष्ट्राची तेजस्विनी पंडिता रमाबाई' या ग्रंथात म्हणतात, "पंडिता रमाबाईंइतके व्रतस्थ राहण्याचे महात्मा गांधींखेरीज अलीकडे क्वचित कोणा हिंदी पुढाऱ्यास साधले असेल." च्या 'Highcaste Hindu Women' या नावाचे पुस्तक रमाबाईंनीच १८८८ प्रारंभी प्रसिद्ध केले. मुळात त्यांना फारसे इंग्रजी येत नव्हते. इंग्लंड-अमेरिकेत जाऊन त्या इंग्रजी शिकल्या, व्याख्याने दिली व इंग्रजीत ग्रंथलेखन केले. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. भारतातील स्त्रियांची दु:स्थिती या ग्रंथात मांडली आहे. या पुस्तकाच्या १०,००० प्रती विकल्या गेल्या व त्यातून बराच पैसा रमाबाईंना मिळाला. जो त्यांनी विधवा शिक्षणाच्या कार्यासाठी वापरला. बायबलचे मराठी भाषांतर रमाबाईंनी केले. (पृष्ठ संख्या १७१७).
सभेत ५ मे १९२२ रोजी रमाबाईंचे निधन झाले. सरोजिनी नायडू मुंबईच्या जाहीर म्हणाल्या, “हिंदू संतमालिकेत जिचे नाव प्रविष्ट करता येईल अशी पहिली ख्रिस्ती व्यक्ती म्हणजे पंडिता रमाबाई होती. '
#पंडिता_रमाबाई यांचे सामाजिक कार्य #शारदा_सदन
https://youtu.be/eL7SJdeE_5I
पंडिता रमाबाई यांच्या जीवनावरील माहिती पट पहाण्यासाठी वरील व्हिडीओ पहा