
१) राधाबाई पेशवे (बाळाजी विश्वनाथ यांच्या पत्नी) : बाळाजी विश्वनाथ भट हा शाहू महाराजांचा विश्वास सेवक असल्याने इ.स. १७१३ मध्ये पेशवेपदाची वस्त्रे त्यास मिळाली. पेशवाईतील कर्तबगार स्त्रियांत तिची ओळख होते. तिला दोन मुले. पहिला बाजीराव, चिमाजीअप्पा व दोन मुली झाल्या. तत्कालीन राजकारणाचा त्यांचा सूक्ष्म अभ्यास होता. पेशवे स्वारीवर असताना पुण्याचा कारभार त्याच पाहत असत. बाजीराव-मस्तानीच्या प्रेमसंबंधामुळे त्या दुःखी होत्या. १७३५-३६ मध्ये त्यांनी काशीयात्रा केली. या तीर्थयात्रेच्या वेळचा पत्रव्यवहार पेशवे दप्तरातून पाहावयास मिळतो. पेशव्यांच्या कुटुंबात राधाबाईंबद्दल फारच आदर होता. त्या ७५ वर्षे जगल्या. आपल्या दोन्ही मुलांच्या मृत्यूचे दुःख त्यांना भोगावे लागले. राधाबाईंनी पेशव्यांच्या तीन पिढ्या पाहिल्या.
२) गोपिकाबाई पेशवे : नानासाहेब पेशव्यांच्या पत्नी. सातारचे श्रीमंत सावकार भिकाजी नाईक-रास्ते यांच्या त्या कन्या. १७३० मध्ये नानासाहेब पेशव्यांशी त्यांचा विवाह झाला. त्या नानासाहेबांच्या पाश्चात्त्य पुणे दरबाराचा कारभार पाहत. विश्वासराव, माधवराव नारायणराव हे तिचे पुत्र. पानिपतच्या भूमीवर पुत्र विश्वासराव व दीर सदाशिवभाऊ यांच्या निधनाने त्या खचून गेल्या. त्याच त्यांचे पतीही पानिपतच्या पराभवानंतर ५ महिन्यांनी वारले. त्यांचे पुत्र माधवराव यांनी २७ जुलै १७६१ रोजी पेशवाईची वस्त्रे मिळली. पण ते अल्पवयीन असल्याने गोपिकाबाईच कारभार पाहत. त्यांना गृहकलहास खूप तोंड द्यावे लागले. त्या नाशिक जिल्ह्यात गंगापूर येथेच वास्तव्यास होत्या. गोपिकाबाईचा बराच पत्रव्यवहार उपलब्ध आहे. माधवरावाच्या अकाली निधनाने (१७७२) त्यांच्यावर तिसऱ्यांदा आघात झाला. त्यानंतर लगेचच त्यांचा तिसरा मुलगा नारायणरावांच्या खुणामागे आनंदीबाई व रघुनाथरावाचा हात होता. आपल्या तिन्ही मुलांचे मृत्यू तिला पाहावे लागले. त्यांच्या खासगी खर्चासाठी ३ गावांचे उत्पन्न त्यांना लावून दिले होते.
३) आनंदीबाई पेशवे : राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या आनंदीबाई या रघुनाथरावांच्या पत्नी होत्या. 'ध' चा 'मा' करणारी, गंगाबाई व सवाई माधवराव यांच्या खुनाचे प्रयत्न करणारी कारस्थानी स्त्री अशी प्रतिमा तयार झाली आहे. नारायणराव पेशव्यांच्या खुनामागे तिचा हात काय? हेही सबळ पुराव्याच्या आधारे स्पष्ट होत नाही. त्याही गोपिकाबाईइतक्याच धार्मिक होत्या. अत्यंत हुशार, सौंदर्यसंपत्र व तरतरीत व्यक्मित्त्वाच्या होत्या. रघुनाथरावांचे राजकारण हे आनंदीबाईच्याच सल्ल्याने चाले. रघुनाथरावांच्या मृत्यूनंतर नाना फडणवीस यांनी तिला कैदेत टाकले होते. त्यांचा बराच वेळ व्रतवैकल्ये, दानधर्म, उपोषणे यात जाई. रघुनाथरावाची इंग्रजांची मदत घेऊन पेशव्यांचो गादी मिळवण्याची खटपट तिला आवडलीन नाही. तिच्याच पोटी बाजीराव दुसरा जन्मास आला होता. ज्याच्या काळांत पेशवाई बुडाली.
४) रमाबाई : माधवराव पेशव्यांच्या पत्नी. रमाबाई माधवरावांचा विवाह १७५३ मध्ये पुण्यात झाला. त्या अतिशय नम्र, प्रेमळ व पतीच्या सेवेसाठी तत्पर होत्या. दानधर्म, पूजाअर्चेत त्यांचा वेळ जाई. त्या अत्यंत धर्मनिष्ठ होत्या. माधवराव पेशवे थेऊर येथे १७५३ मध्ये मृत्यू पावले तेव्हा त्या सती गेल्या. आपले सर्व दागिने त्यांनी सतीप्रसंगी आलेल्या सुवासिनींना दिले. सतीप्रसंगी त्यांचे वय २५ होते. पेशव्यांच्या घराण्यात सती जाणारी ती पहिलीच स्त्री होती. ती स्वैच्छेने सती गेली होती. ती सती जाताना धर्मकृत्ये व दानधर्म मोठ्या प्रमाणात केला गेला. त्यांचा राजकारणात सहभाग मुळीच नव्हता.
इचलकरंजी व सावंतवाडी या दोन जहागीर घराण्यात दोन कर्तृत्ववान स्त्रिया निर्माण झाल्या होत्या. इचलकरंजी संस्थानात अनुताई घोरपडे, तर सावंतवाडी संस्थानच्या राणी लक्ष्मीबाई व दुर्गाबाई या दोन कर्तृत्ववान स्त्रिया होत्या.
५) शाहू महाराजांच्या राण्या : बिरुबाई, सगुणाबाई, सकवारबाई. छ. संभाजी व येसूबाई यांचे शाहू महाराज हे पुत्र. औरंगजेबच्या अटकेत असताना शाहूंचा विवाह झाला होता. बिरुबाई ही शाहूंची पत्नी नसली तरी शाहूंच्या दरबारात त्यांना मोठा मान होता. शाहूंनी औरंगजेबच्या छावणीतून सुटका केल्यानंतर सगुणाबाई व सकवारबाईशी विवाह केले होते. बिरूबाईच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकणारी कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत. शाहू महाराजांच्या अनेक पत्रांची उत्तरे त्यांच्यातर्फे बिरुबाई लिहीत. शाहूंशी त्या एकनिष्ठ होत्या. बिरुबाईच्या मृत्यूनंतर मात्र शाहू महाराजांना सगुणाबाई व सकवारबाई यांच्याकडून मनस्ताप सहन करावा लागला. त्या दोघीतही अंतःस्थ कलह होता. सवतीमत्सर होता. त्या दोघींना कन्या झाल्या होत्या. पुत्र नव्हता. म्हणजे शाहू महाराजांना पुत्रसंतान नव्हते. सकवारबाई सती गेल्या होत्या. त्याचबरोबर शाहूंच्या दोन नाटक शाळाही सती गेल्या.
६) बायजाबाई शिंदे : दौलतराव शिंदे यांच्या पत्नी. अतिशय बुद्धिमान व कर्तृत्ववान स्त्री. दौलतराव शिंदे यांनीही पत्नीचा अभिमान होता. ते राज्यकारभारात नेहमी तिचा सल्ला घेत. बायजाबाईंनी पती निधनानंतर राजवैभवाचा त्याग केला होता. (द. ब. पारसनीय यांनी 'महाराणी बायजाबाई शिंदे' हा छोटेखानी ग्रंथ लिहिला आहे.) बायजाबाईंनी स्त्रियांची एक पलटणच उभारली होती,
७) मस्तानी : बाजीराव पहिला हा बाळाजी विश्वनाथचा मुलगा. १८ ऑगस्ट १७०० मध्ये बाजीराव पहिला हा जन्मास आला. १७ ऑगस्ट १७२० ला त्याला पेशवाईची वस्त्रे प्राप्त झाली. विशेषतः पालखेडचे युद्ध, डभोईचे युद्ध, भोपाळचे युद्ध इ. युद्धांत बाजीराव पहिला याने मोठा विजय प्राप्त केला होता. पहिल्या बाजीरावची पहिली पत्नी काशीबाई होती व ती महादजी कृष्णा जोशी यांची कन्या होती. मस्तानी ही बुंदेलखंडचा राजा छत्रसाल याची मुलगी होती. राजा छत्रसाल याची अशी इच्छा होती की, आपले उत्तर भारतावर राज्य असावे. मोहंमदशहा बंगश हा मोगल सरदार व राजा छत्रसाल यांच्यात सतत संघर्ष चालू होता. इ.स. १७२८ मध्ये मोहंमदशहा बंगश याने राजा छत्रसालच्या राज्यावर हल्ला व त्यास पराभूत केले. त्याने मदतीसाठी पहिला बाजीराव पेशवा व चिमाजीअप्पास पत्रे लिहिली. पहिला बाजीराव त्याच्या मदतीस धावून गेला व मोहंमदशहा बंगश पराभूत झाला. त्या लष्करी मदतीचा मोबदला म्हणून राजा छत्रसालने बाजीरावास ३३ लाख रुपये उत्पन्नाचा मुलूख दिला. राजा छत्रसालला अनेक राण्या होत्या (संख्या १३-१९ असावी.) त्यापैकी हुजारिन नावाच्या राणीपासून मस्तानी झाली होती. या मस्तानीचा विवाह इ.स. १७३० मध्ये पहिल्या बाजीरावशी झाला होता. हा प्रेमविवाह नव्हता तर ठरवून केलेला विवाह होता. मुस्लिम स्त्री व ब्राह्मण पुरुष यांच्यातील ठरवून झालेला हा पहिलाच विवाह असावा. बाजीरावाचे मद्य-मास सेवन व मस्तानीबरोबरचा नित्य सहवास या गोष्टी सनातनी समाजाला बोचत होत्या. रणभूमीवरदेखील प्रेरणा देणारी मस्तानी हे बाजीरावाचे शक्तिस्थान होती. मस्तानी अश्वारोहणात कुशल होती. बाजीरावाप्रमाणेच तलवार, भाला घेऊन ती त्याच्याबरोबर भरधाव घोडदौड करू शकत होती. युद्धमोहिमांत ती बाजीरावसोबत असे व हीच बाब बाजीरावाच्या घरच्यांना नको होती.
डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागातील कै. डॉ. पंढरीनाथ रानडे यांना १८ व्या शतकातील मोडी लिपीतील एक पत्र इंदूर येथे मस्तानीच्या वारसांकडून प्राप्त झाले होते. त्या पत्रानुसार बाजीराव-मस्तानीचा विवाह पुण्याजवळ पाबळ येथे झाला होता असे म्हटले आहे. आधुनिक काळातील नवीन पुराव्यांद्वारे मस्तानीची आई एका हिंदू बापाची मुलगी होती. औरंगजेबने त्यास बाटवून मुस्लिम केले होते. त्याची मुलगी ही मस्तानीची आई होती.