मराठी भाषेचा उगम व व्याकरण
मराठी भाषा उत्पत्ती विषयी
मराठी भाषेच्या उत्पत्ती विषयी विद्वानांमध्ये मतभेद असलेले दिसतात. इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांच्या मते, मराठीची उत्पत्ती पाणिनी पूर्वकालीन आर्य भाषा व त्याहीपूर्व वैदिक भाषांपासून झाली आहे असे मानतात. डॉ.शं.गो. तुळपुळे मात्र राजवाडेंची ही उत्पत्ती वास्तवाला धरून नसल्याचे मानतात. गियर्सन आणि डॉ.कृ.पा.कुलकर्णी यांनी (A Linguistic Survey of India, Volume I, Part I, Chapter XII) मध्ये मांडलेला इंडो आर्यन भाषांच्या विकासाचा आलेख मात्र वास्तवाला धरून असल्याचे अनेक विद्वानांचे मत आहे. गियर्सनच्या मते वेदपूर्व कालीन किंवा वैदिक भाषा ही एकच भाषा नसून ते विविध बोलींचे समूह होते. या विषयीचे विस्तृत विवेचन हार्वर्ड विश्वविद्यालयातील संस्कृत भाषेचे व्यासंगी विद्वान प्रा.मिखाएल विटझेल यांनी केले आहे. या भाषांपैकी एका उत्तर कालीन वैदिक बोलीभाषेचे व्याकरण पाणिनीने रचून तिला स्थिर आणि नियमबद्ध रूप दिले, तीच भाषा आज आपल्याला माहित असलेली संस्कृत भाषा होय. या भाषेत अनेक ग्रंथ रचले गेले आणि विद्वानांची भाषा म्हणून मान्य झाली. संस्कृत प्रस्थापित झाल्यावर सुद्धा लोकांच्या बोलीभाषेतील प्राकृत भाषा मात्र कायम टिकूण होत्या. तसेच या प्राकृत भाषांचा विस्तार व विकास पुढे झालेला दिसतो. प्राकृत भाषा म्हणजे लोकांच्या बोलीभाषेतील भाषा होय. पुढे या प्राकृत भाषांचे दोन गट झालेले दिसतात.
1) पूर्वेकडील –
मागधी
2) पश्चिमेकडील - शौरसेनी
वरील दोन्ही भाषांच्या मध्ये आढळणारी भाषा अर्धमागधी म्हणून ओळखली जाते. अर्धमागधी भाषा सामान्यपणे मध्यप्रदेश व उत्तर प्रदेशात विस्तार पावलेली दिसते. मध्य प्रदेशाच्या दक्षिण भागाकडे आणि महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाड्यात महाराष्ट्री प्राकृत भाषेचा उदय झालेला दिसतो. या भाषांतील सिमा रेषा मात्र स्पष्टपणे सांगता येत नाही.
महाराष्ट्र भाषेतील उपलब्ध साहित्य व त्यांचे काळ
टीप : गाथा सप्तशती (गाथा सत्तसई) हा ग्रंथ ज्ञात ग्रंथांपैकी आद्यग्रंथ मानला जातो.
1) सेतुबंध- -- प्रवरसेन (इ.स. पाचवे शतक)
2) गौडवध –
वाक्पतिराज (इ.स. 8 वे शतक)
3) लीलावती – कौतूहल (इ.स. 8 वे शतक)
4) चिन्हकाव्य -- कृष्णलीलाशुक
(इ.स. 13 वे शतक)
5) विवेकसिंधू -- - मुकुंदराज (इ.स. 13 वे शतक)
6) भावार्थदीपिका
/ ज्ञानेश्वरी –-
ज्ञानेश्वर (इ.स. 13 वे
शतक)
7) लीळाचरित्र-- म्हाइंभट्ट
(इ.स. 13 वे शतक)
8) दृष्टांत पाठ --- केशवदेव
व्यास (इ.स. 13 वे शतक)
9) पंचवार्तिक --- भीष्माचार्य (इ.स. 13 वे शतक)
■ मराठी भाषा प्राचीन भाषा असल्याचे काही पुरावे
डॉ. तुळपुळे यांनी पुढील प्राचीन मराठी कोरीव लेखांची नोंद ठेवलेली आहे.
टीप : 2220 वर्षांपूर्वीचा ब्राह्मी लिपीतील शिलालेख, की जो पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळच्या नानेघाटात असून त्यावर ‘महारठिनों' ही अक्षरे कोरलेली आहेत, हा शिलालेख मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख मानला जातो.
*इतर काही
शिलालेख
लेखाचे नाव_-------------------------- स्थळ व काळ
1. शिलाहार केशिदेव (I) यांचा अक्षी शिलालेख___अक्षी, जि. कुलाबा (934)
2. कुडल शिलालेख…. ____ कुडल, जि. सोलापूर (940)
3. दिवे - आगार ताम्रपट…… _____दिवे-आगार, जि.रत्नागिरी (982)
4. महाकुमार सिंघनदेवाचा चनई शिलालेख…_____ चनई, जि.बीड (1002)
5. चामुंडराज गंगराज यांचा गोम्मट शिलालेख ___श्रवणबेळगोळ, जि.हसन, कर्नाटक (1039)
6. गंग उदयादित्याचा आंबे शिलालेख ___आंबेजोगाई, जि. बीड (1066)
7. भांदक शिलालेख ___भांदक, जि. चांदा (1068)
8.. शिलाहार हरिपाल देवाचा रांजली शिलालेख ___रांजली, जि. रत्नागिरी (1070)
9. गंग उदयादित्याचा गरसोळी शिलालेख___ गरसोळी, जि.बीड (1071)
10. पळसदेव येथील सरडेश्वराचा शिलालेख ___ गारदौंड, जि. पुणे (1079)
11. कळचुर्य विज्जण यांचा तेर शिलालेख ___तेर, जि. उस्मानाबाद (1086)
12. कदंब
मुरूडदेव याचा सावरगाव शिलालेख ___काटी-सावरगाव, जि.
उस्मानाबाद (1086)
13. शिलाहार
अपरादित्यदेव (II)
यांचा परळ शिलालेख___ माहवली, जि. मुंबई
(1108)
14. पंढरपूरच्या विठ्ठल देवाचा शिलालेख___पंढरपूर, जि. सोलापूर (1111 )
15. जैत्र सामंताचा जालगाव ताम्रपट____जि. रत्नागिरी (1124)
16. यादव सिंघन यांचा पाटण शिलालेख __ पाटण, जि.धुळे (1129)
17. यादव सिंघन
यांचा कोल्हापूर शिलालेख____कोल्हापूर (1160)
18. नेवासे येथील
कणैरेश्वराचा शिलालेख___ नेवासे, जि. अहमदनगर (1161)
19. यादव
कृष्णदेव यांचा तासगाव ताम्रपट ___तासगाव, जि. सांगली (1172)
20. राणेबेन्रुर
येथील स्मारक लेख
______राणेबेनुर, जि. धारवाड (1174)
21. बिरजवाडी
शिलालेख ___बिरजवाडी, जि.औरंगाबाद (1174)
22. यादव
कृष्णदेव यांचा नांदगाव शिलालेख__ नांदगाव, जि. अमरावती (1177)
23. पंढरपुरचा
चौऱ्यायंशी शिलालेख
______पंढरपूर, जि. सोलापूर (1195-99)
24. यादव
रामचंद्र यांचा उन्हकदेव शिलालेख____ उन्हकदेव, जि. आदिलाबाद (1201)
25. मंगळवेढ्याचा
चंडिकाईचा शिलालेख ___ मंगळवेढे, जि. सोलापूर (1204)
26. यादव
राचमंद्र यांचे वेळापूर येथील तीन शिलालेख __वेळापूर, जि. सोलापूर (1222-1227)
27. यादव
रामचंद्र यांचा हातनूर शिलालेख __हातनूर, जि. औरंगाबाद (1223)
28. यादव रामचंद्र यांचा कोरवली शिलालेख____ कोरवली, जि. सोलापूर (1225)
(सदर माहिती अभिजात भाषा समिती महाराष्ट्रराज्य यांच्या अहवालातून घेण्यात आली आहे.)
*अभिजात भाषा
जी भाषा प्राचीन
असून त्याकाळी मान्यता प्राप्त होती. त्याचबरोबर तिचे अस्तित्व आधुनिक काळातही
टिकूण आहे. अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो. यासाठी केंद्र सरकारकडून
अशा भाषेच्या संवर्धनासाठी मदत केली जाते. आतापर्यंत 6 भाषांना हा दर्जा प्राप्त आहे.
मराठी
भाषेलासुद्धा हा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी राज्यशासनाकडून केंद्र सरकारकडे
प्रस्ताव पाठविण्याकरिता मराठी भाषेच्या प्राचीन
"अस्तित्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी खालील समिती नेमण्यात आली होती.
अभिजात भाषेसंदर्भात केंद्र सरकारचे निकष :
1) भाषेची
प्राचीनता
2) भाषेची
मौलिकता आणि सलगता
3) भाषेची
मौलिकता आणि वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूपन
4) प्राचीन भाषा
व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणाऱ्या खंडासह जोडलेले नाते.
*अभिजात
मराठी भाषा समिती
अध्यक्ष प्रा.
रंगनाथ पठारे
स्थापना (राज्य
शासन) : 10 जानेवारी 2012
सदस्य
1. प्रा. हरी
नरके
2. डॉ. श्रीकांत
बहुलकर
3. श्री. सतीश
काळसेकर
4 प्रा. आनंद
उबाळे
5 डॉ. नागनाथ
कोतापल्ले
6. डॉ. कल्ल्याण
काळे
7. श्री. परशुराम
पाटील
8. प्रा. मधुकर
वाकोडे
9. डॉ. मैत्रेयी
देशपांडे
2 ) मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी
इंग्रज भारतात आल्यानंतर खऱ्या अर्थाने शालेय शिक्षणाला सुरूवात झाली; परंतु त्यासाठी नियोजित असा अभ्यासक्रम असणे आवश्यक होते. असा प्रयत्न १८२२ मध्ये “हैंदशाळा मंडळी” या संस्थेने केला. विल्यम कॅरी यांनी जरी पहिले व्याकरणाचे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला असला तरी जॉर्ज जार्विस यांनी १८२४ मध्ये पंडित जगन्नाथ शास्त्री, रामचंद्र शास्त्री, बाळशास्त्री व गंगाधर शास्त्री यांच्याकडून व्याकरण लिहूण घेतले. हा मराठी व्याकरणाचा पहिला प्रयत्न होय. या सर्व पंडित मंडळींचा संस्कृत व्याकरणाचा गाढा अभ्यास होता. त्यामुळे इंग्रजीला आधारभूत माणून या व्याकरणकर्त्यांनी लिहिलेल्या या पुस्तकावर “संस्कृत व इंग्रजी” अशा दोन्ही भाषांचा प्रभाव दिसतो. वरील चारपैकी गंगाधर शास्त्री फडके यांनी १८३६ मध्ये 'महाराष्ट्र भाषेचे व्याकरण' हे पुस्तक लिहिले. हे मराठीतील पहिले मुद्रित व्याकरण होय. १८३६ मध्येच बाळशास्त्री जांभेकर यांनी 'बालव्याकरण' लिहिले; परंतु त्यात तितकीशी प्रगल्भता नव्हती. हे पुस्तक प्रश्नोत्तर स्वरूपात होते.
१८३६ मध्ये दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिले. दादोबांनी मराठी भाषेच्या व्याकरणासाठी जे योगदान दिले त्यामुळे त्यांना 'मराठी भाषेचे पाणिनी' असे म्हणतात. तर्खडकर, जांभेकर व फडके यांची तिन्ही पुस्तके १८३६ मध्येच प्रकाशित झाली; परंतु आद्य व्याकरणकर्ते होण्याचा मान फडकेंना जातो कारण गंगाधर शास्त्री फडके यांचे व्याकरण प्रसिद्ध झाल्यावर तीन महिन्यानंतर तर्खडकरांचे व्याकरण प्रसिद्ध झाले. त्यानंतर १९११ मध्ये दामलेंचे 'शास्त्रीय मराठी व्याकरण' व १९५२ मध्ये म.पा.सबनीस यांचे ‘आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण' हे पुस्तक प्रसिद्ध झाले.
*व्याकरणाचे महत्त्व व प्रकार
प्रत्येक भाषेला व्याकरण असते. भाषा निर्मिती होतानाच एका विशिष्ट रचनेनुसार होत असते. प्रथम बोलीभाषा व नंतर लेखी भाषा असे स्वरूप असते. लेखी स्वरूपाने भाषेला स्थिरता प्राप्त होते. साधारणतः १३ व्या शतकापासून मोठ्या प्रमाणात लेखी साहित्य निर्मितीला सुरुवात झाली; परंतु त्यापूर्वीसुद्धा लेखी भाषेच्या अस्तित्वाचे थोड्याफार प्रमाणात पुरावे सापडतात. मराठी व्याकरणाला दिशा देण्याचे काम खऱ्या अर्थाने इंग्रज व पोर्तुगीजांनी केलेले दिसते. भाषेसाठी व्याकरण अतिशय महत्त्वाचे असते. कारण त्यामुळे भाषा प्रमाणबद्ध रितीने मांडली जाते. सामान्यपणे व्याकरण लेखणाचे आदेशात्मक, वर्णनात्मक, ऐतिहासिक, तौलनी असे प्रकार मानले जातात. भाषेचे बोलीभाषा व लेखिभाषा असे दोन प्रकार माणले जातात. बोलीभाषेपेक्षा लेखी भाषा अधिक स्थिर असते.
(भारतातील भाषा प्रामुख्याने दोन मुख्य भाषिक गटांत विभागल्या गेल्या आहेत.)
A A) इंडो/युरोपीय (इंडो-आर्य भाषा)
B B) द्रविडीय भाषा
1) संस्कृत आणि तमिळ या भाषा भारतातील सर्वांत जुन्या भाषा मानल्या जातात.
2) भारतीय
राज्यघटनेच्या कलम 343 नुसार हिंदी तसेच इंग्रजी या संघराज्याच्या व्यवहारांच्या
भाषा आहेत.
3) सध्या भारतीय घटनेनुसार देशात बोलल्या जाणाऱ्या 22 प्रादेशिक भाषांना राजकीय/राजभाषेचा दर्जा देण्यात आला आहे.
4) आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, संथाली, तमिळ, तेलगू, उर्दू इ.
5) प्रत्येक भाषेला तिचा स्वतःचा वैशिष्ट्यपूर्ण इतिहास व परंपरा असते. मराठी भाषेचा विकास संस्कृत-प्राकृत भाषांपासून झाला असला तरी गुजराती, हिंदी, फारशी, अरबी, कानडी व इंग्रजी या भाषांनी मराठी भाषेला अधिक संपन्न बनवण्याचे काम केले आहे. टीप : भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही.
3 भाषा, लिपी व स्वरूप
1) भाषा: 'विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. '
· भाषा ही ध्वन्यात्मक असते. ध्वनी हे भाषेचे मूलभूत घटक असतात.
· बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय.
· भाषा ठराविक कालावधीनंतर व प्रदेशानुसार बदलत जाते; म्हणून भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात.
· ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे, आकलन या पाच कौशल्यांवर भाषाशिक्षण अवलंबून असते.
· भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हींचा समावेश होतो.
· भाषा केवळ संवादाचे साधान नसून साहित्याच्या क्षेत्रात ती एक आत्माविष्काराचे माध्यम आहे.
2) “भाषेचे स्वरूप” :
1) मातृभाषा : आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषा असे म्हणतात.
2) बोली भाषा :
दैनंदिन जीवनात संपर्कासाठी / संवादासाठी आपण जी भाषा वापरतो ती बोली भाषा असते.
3) भाषेचे खालील दोन प्रकार मानले जातात.
1)
स्वाभाविक/नैसर्गिक (पुरावा नसतो) : बोलणे, हावभाव, पशुपक्ष्यांचे आवाज, नाटक
2) कृत्रिम/ सांकेतिक (पुरावा असतो) : टंकलेखन, लिखाण, अक्षरे, चिन्हे, ध्वनिमुद्रन
*”उगमस्थान” :
1) मराठी भाषा संस्कृत व प्राकृत या भाषांपासून विकसित झाली आहे असे मानले जाते.
2) 'भाषा' हा शब्द संस्कृतमधील 'भाष' या धातूपासून आला आहे. याचा अर्थ 'बोलणे' असा होतो.
*लिपी :
·
लिपी हा शब्द 'लिंपणे' या शब्दावरून रूढ झाला असून
आपण ज्या खुणांनी लेखन करतो, त्याला लिपी असे म्हणतात.
· मराठी भाषेची लिपी 'देवनागरी' असून ती डावीकडून उजवीकडे लिहितात.
· मराठी भाषेला प्राकृत, महारठी, देशी, मराठी ही वेगवेगळ्या काळातील नावे आहेत
·
मराठी, गुजराती, संस्कृत, हिंदी, बंगाली व पाली या
भाषांची लिपी 'देवनागरी' आहे. लिपीच्या शोधाने लेखन शक्य झाले आहे.
· दक्षिण भारतातील भाषा द्रविडीयन गटातील असून त्यांना अभिजात (मूळ) भाषांचा दर्जा आहे.
“*महत्त्वाचे”
संस्कृत धातू_________ तयार झालेला शब्द
·
भाष् ______ भाषा
·
लिप् ______ लिंपणे
· लिख् ______ लिखाण
■ काही महत्त्वाच्या प्राचीन लिपी :
1) 1) ब्राह्मी लिपी : भारतातील एक अत्यंत प्राचीन व महत्त्वाची लिपी. भारतातील सर्व लिपींची ही जननी मानली जाते. साक्षात ब्रह्मदेवाने ही लिपी शोधली; म्हणून तिचे नाव ब्राह्मी लिपी पडले अशी विचारधारा आहे; परंतु याबाबत विद्वानांमध्ये मतभेद आहेत.
2) **2) खरोष्ठी लिपी : ही लिपी गान्धारी लिपी या नावानेसुद्धा ओळखली जाते. या लिपीचा प्रयोग तिसऱ्या शतकापर्यंत प्रामुख्याने आशिया खंडात केला गेला. कुषाण काळात भारतात या लिपीचा प्रामुख्याने उपयोग केला गेला. बौद्ध उल्लेखात खरोष्ठी लिपीचा प्रामुख्याने उल्लेख सुरुवातीपासून येतो.
3) देवनागरी लिपी : ही लिपी प्रामुख्याने आर्यांची लिपी मानली जाते. आर्य स्वत:ला देव मानत. ते नगरात राहत असत. यावरून नगरात राहणाऱ्या देवांची लिपी; म्हणून या लिपीला देवनागरी लिपी म्हणतात. देवनागरी लिपीला 'बाळबोध' लिपी असेसुद्धा नाव आहे. प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असल्याने देवनागरी लिपी परिपूर्ण लिपी मानतात.
4) मोडी लिपी : मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती, तिला 'मोडी लिपी' असे म्हणत. मोडी लिपीला “धावलिपी” असेसुद्धा म्हणतात.
1) विल्यम कॅरी _____ द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज (इंग्रजी) (1805)
2) गंगाधरशास्त्री फडके ___ महाराष्ट्र भाषेचे व्याकरण (1836)
3) दादोबा पांडुरंग तर्खडकर ___ महाराष्ट्र भाषेचे व्याकरण (1836)
4) मोरो केशव दामले ____ शास्त्रीय मराठी व्याकरण (1911)
5) म. पा. सबनीस _____ आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण
6) कृष्णशास्त्री
चिपळूणकर ____ मराठी व्याकरणावर निबंध
7) कृ.पां. कुलकर्णी _______ मराठी व्याकरणाचे व्याकरण
8) प्रा.
अरविंद मंगरूळकर____ मराठी व्याकरणाचा पुनर्विचार
9) ग.ह. केळकर ______ मराठी व्याकरणाची मूलतत्त्वे
10) डॉ. लीला गोविलकर _____ मराठीचे व्याकरण
11) डॉ. कल्याण काळे,
डॉ. अंजली सोमण____
वर्णनात्मक भाषाविज्ञान स्वरूप आणि पद्धती
12) प्रा.
राजशेखर हिरेमठ ____ मराठी व्याकरण परिचय
13) मो. रा. वाळंबे _____ सुगम मराठी व्याकरण
*महत्त्वाचे*
1) मराठी भाषेचे
पाणिनी_____ दादोबा पांडुरंग तर्खडकर
3) मराठी भाषेचे
जॉन्सन ____ कृष्णशास्त्री चिपळूणकर